लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र

  • कळंबोली विकास कृती समितीची शाळेय फी माफ करण्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
    पनवेल- वार्ताहर
    कोरोना ने सर्व जग भरात हाहाकार पसरविला आहे व त्यामुळे लॉक डाऊन हे दिवसेंदिवस वाढतच गेले असे असताना बऱ्याच लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर अनेक लोकां च्या नोकऱ्या ही गेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे महामारी तर पसरली आहेच त्याबरोबर बेरोजगारी ही बघायला मिळते. अश्या परिस्थिती मध्ये कुणीही पैशा अभावी
    शिक्षणा पासून वंचित राहू नये व सरकार कडून पालकांना दिलासा मिळावा या करिता कळंबोली विकास कृती समितीने कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळावधीतील पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळेय फी माफ करण्याबाबत आपल्या राज्याच्या आदरणीय शिक्षणमंत्री मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या कडे मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘स्वाक्षरी मोहीम’ ही राबविली आहे.
    पालकांनी या स्वाक्षरी मोहीमे ला चांगला प्रतिसाद ही दिला आहे व लाॅकडाऊन मुळे जे पालक स्वाक्षरी करु शकले नाहीत आणि जे पालक गावी गेले आहेत अशा पालकांनी आदरणीय शिक्षणमंत्री मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना त्यांच्या या min.sedu@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर लाॅकडाऊनच्या कालावधीतील फी माफ करण्याबाबत विनंती करावी असे आव्हान कळंबोली विकास कृती समिती तर्फे सर्व पालकांना करण्यात आले आहे. या बाबतचे सविस्तर पत्र गटशिक्षणाधिकारी यांना व अन्य संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे याबाबत आपण सतत पाठपुरावा चालु ठेवणार आहोत असे कृती समितीचे अध्यक्ष श्री विजय गर्जे यांनी सांगितले आहे.
  • 8 जून को अपने गांव जाने वाले यात्रियों को कुर्ला टर्मिनस तक जाने के लिए ट्रेन सुविधा मिलेगी या नहीं थाने जिल्हा के अंबरनाथ उल्हासनगर के यात्रियों में चिंता का विषय

    मुंबई से 8 जुन को देश के अन्य जगहों पर जाने के लिये सैंकड़ो ट्रेनों के लाखों रिज़र्वेशन तो सरकार ने और रेल्वे मंत्रालय ने पैसे लेकर दे दिये,
    अब कुर्ला या बांद्रा तक अम्बरनाथ बदलापुर उल्हासनगर कल्याण डोम्बिवली के लोग कैसे जायेंगे…!!!???
    लोकल ट्रेन में आम प्रवासी जा नहीं सकता, बेस्ट की बसें जो मुंबई से इस तरफ चल रही है उसमें मात्र 5-6 लोगों को लाते ले जाते है बाकी बसें अम्बरनाथ से मुंबई तक खाली जाती है,
    प्राइवेट कार वाले 2 लोगों के ले जाने के 2000 से 4000 मांग रहे है,
    घर से स्टेशन तक सामान ले जाने के लिये ऑटो नहीं मिल रहे, स्थानीय स्टेशन से कुर्ला बांद्रा जाना हो तो लोकल ट्रेन बन्द है, सरकारी अधिकारियों कर्मचारियों को ले जाने वाली खाली लोकल ट्रेन में प्रवासियों को चढ़ने नहीं दिया जाता,
    अब रेल प्रशासन और महाराष्ट्र सरकार बताए कि, आपने गांव जाने के लिये सैंकड़ों ट्रेनें तो शुरू कर दी, लाखों रिज़र्वेशन के पैसे भी जमा कर लिये परंतु कुर्ला या बांद्रा तक हम अम्बरनाथ बदलापुर उल्हासनगर कल्याण डोम्बिवली के प्रवासी लोग कैसे जायेंगे…!!!??? यात्रियों में चिंता का विषय बना हुआ है

  • रिपोर्टर :- कृष्णा महाले उल्हासनगर
    3 मे 2020

    उल्हासनगर – उल्हासनगरातील कोरोना रुग्णांची संख्या 427 पर्यंत पोहचली असून 3 जून रोजी 15 नवे रुग्ण सापडले तर 171 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण 17 रुग्ण दगावले असून 239 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.
    यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रात 3 जून रोजी 15 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून उल्हासनगर शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 427 पर्यंत पोहचली आहे. 239 रुग्ण उपचार घेत असून लक्षण नसलेले 185, सौम्य लक्षण असलेले 31, ऑक्सीझनवर 6 रुग्ण आहेत. आय सी यू मध्ये 17 रुग्णावर उपचार सुरू आहेत. या कोरोनाच्या रुग्णांपैकी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 171 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
    बदलापूर येथील 7 आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील 2 रुग्णांवर, मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील 2 अशा प्रकारे 11 रुग्णांवर उल्हासनगर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच कोविड रुग्णालयातून आणि राज्य विमा कामगार योजना रुग्णालयातून 3 जून रोजी 19 कोरोना मुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले. 3 जून रोजी एका कोरोना बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यूचा आकडा आता 17 पर्यंत पोहचला आहे.
    कोविड रुग्णालय येथे 59, रुग्ण, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे 57 रुग्ण, टेउरम कोरोना केअर सेंटर येथे 8 रुग्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे 85 रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी 30 रुग्ण उपचार घेत आहेत. उल्हासनगर कोविड रुग्णालयात ठाणे महापालिका क्षेत्रातील 2, मुंबई महापालिका क्षेत्रातील 2 रुग्ण आणि बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील 7 रुग्ण उपचार घेत आहेत. उल्हासनगर कोविड रुग्णालय येथे 59, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात 57 रुग्ण, ठाणे येथे 4 रुग्ण, कल्याण डोंबिवली येथे 3 रुग्ण, भिवंडी निजामपूर येथे 1 रुग्ण, मुंबई येथे कामा रुग्णालयात 3 रुग्ण व वाशी येथील रिलायन्स रुग्णालयात 8 आणि कोरोकेअर सेंटर सेंट्रल पार्क येथे 10 रुग्णांवर उपचार सुरू असून 171 रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले असल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले.
    अशा प्रकारे एकूण 15 कोरोना बाधित झालेले रुग्ण मिळून आले तर आज 19 कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुहास मोहनाळकर यांनी दिली.
    3 जून रोजी 14 कोरोना बाधित झालेले रुग्ण आढळले आहेत. यात कॅम्प नंबर 2 येथील ओटी सेक्शन परिसरात 2 रुग्ण आढळले तर रमाबाई आंबेडकर नगर येथे 3 रुग्ण, कॅम्प नंबर 2 मधील प्रिया अपार्टमेंट मध्ये 1 रुग्ण, कॅम्प नंबर 5 मध्ये राजीव गांधी नगर येथे 2, सी ब्लॉक रोड येथे 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे, शिवनेरी हॉस्पिटल येथे 1 रुग्ण, शाखा संतोष नगर येथे 1 रुग्ण, कॅम्प नंबर 3 दत्त मंदिर येथे एक रुग्ण, कॅम्प नंबर 3 येथील एक आणि कॅम्प नंबर 4 येथील एक असे दोन कोरोना बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुहास मोहनाळकर यांनी दिली.
  • उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली
    तसेच अंबरनाथ येथील खुंटवली या ठिकाणी 2 मोठे झाडे पडली
    उल्हासनगर अंबरनाथ मध्ये 3 मे रोजी सुरू झालेल्या पावसामुळे व वाहत असलेल्या वाऱ्या मुळे अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत…………………………… ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • अंबरनाथ पासुन वाहत असलेल्या वालधुनी नदीमध्ये पहिल्याच पावसात जल पर्णी वाहत आली असून उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळील पुलाजवळ जलपर्णी जमा झाली आहे त्या जलपर्णी मुळे नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले ………………………………………………………………. गेल्या काही दिवसापासून याच नदीचे सफाई करण्याचे काम उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी व कर्मचारी करीत असताना जलपर्णी या ठिकाणी पुन्हा जमा झाली असून उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी व कर्मचारी यांना या नदीची सफाई करण्याचे काम पुन्हा करावे लागणार आहे………………………………………………………………… ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
  • उल्हासनगर कॅम्प नंबर 3 रेल्वे स्टेशन रोड वर ऑईल सांडले वाहने स्लिप होताना दक्ष नागरिकांनी पाहताच रस्ता केला होता बंद
    वाहन चालकांना कोणतीही हानी होउ नये याकरिता दक्ष नागरिकांनी whatsapp वर केला रस्त्याचा फोटो व्हायरल
    उल्हासनगर शहरात रेल्वे स्टेशन रोड वर ऑईल सांडले असताना त्या रस्त्यांनी ये जा करीत असलेल्या वाहन स्लीप होऊन पडत असल्याची माहिती स्थानिक दक्ष नागरिक यांनी पाहताच त्वरित त्या रस्त्यावर वाहनांची ये जा बंद करण्यात आली व व्हॉटसअप वर व्हिडिओ व्हायरल केला व्हिडिओ व्हायरल होताच उल्हासनगर महानगर पालिका चे वरिष्ठ अधिकारी मा. विनोद केणे आणि मा. एकनाथ पवार साहेब यानी ऑईल पडलेल्या रस्त्यावर महानगर पालिका कर्मचारी पाठवले आणि त्या रस्त्याची सफाई करून ब्लिचिंग पावडर टाकून रस्ता राहादरी साठी व्यवस्थित केला. या रस्त्यावर ऑईल कसे पडले याची माहिती मिळाली नसून . सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे…………………………….. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • उल्हासनगर शहरात दिनांक १९ मार्च पासून ३०/मे/२०२० रोजी पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३३५ वर पोहचली आज पर्यंत १३५ रुग्ण बरे झाले आहेत तर १८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत त्या पैकी १६० रूग्णांवर कोरोणाचि लक्षणे सापडली नसून २१ रूग्णांवर सौम्य लक्षणे आढळली आहेत मार्च पासून आता पर्यंत कोरोनामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सध्या ०८ रुग्ण ऑक्सिजन’वर आहेत सध्या उल्हासनगर कॅम्प नं ४ कोरोना रुग्णालय येथे ७५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्य कामगार विमा रुग्णालय उल्हासनगर कॅम्प नं ३ याठिकाणी ८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच उल्हासनगर केंप नं ५ कोरोना केअर सेंटर येथे ०७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच ठाणे येथे ०२ रुग्ण उपचार घेत आहेत तर कल्याण डोंबिवली येथे ०२ रुग्ण उपचार घेत आहेत भिवंडी निजामपूर या ठिकाणी ०१ रुग्ण उपचार घेत आहे मुंबई मधील कामा हॉस्पीटल मध्ये ०३ रुग्ण उपचार घेत आहेत तसेच रिलायन्स हॉस्पिटल वाशी येथे ०८ रुग्ण उपचार घेत आहेत कोरोना केअर सेंटर सेंट्रल पार्क येथे ०४ रूग्णांवर उपचार सुरू आहे आज दिनांक ३० मे २०२० रोजी उल्हासनगर कॅम्प नं ५ साई वसनशाह दरबार याठिकाणी १० रुग्ण आढळले आहेत तर आंबेडकर नगर चोपडा कोर्ट येथे ०२ रुग्ण आढळले तसेच सम्राट अशोक नगर उल्हासनगर कॅम्प नं ३ येथे ०३ रुग्ण आढळले असून उल्हासनगर कॅम्प नं ४ याठिकाणी ०४ रुग्ण आढळले आहेत तसेच उल्हासनगर कॅम्प नं ४ शाळा क्रमांक १४ या ठिकाणी ०२ रुग्ण आढळले आहे तसेच उल्हासनगर कॅम्प नं ३ येथे ०१. आनंद नगर येथे ०१. उल्हासनगर कॅम्प नं ४ रवींद्र नगर येथे ०१ रुग्ण. उल्हासनगर कॅम्प नं ५ गायकवाड पाडा येथे ०१ . सेक्शन ३० या ठिकाणी ०१. सेक्शन ३५ येथे ०२ . उल्हासनगर कॅम्प नं २ विक्रांत अपार्टमेंट येथे ०१ उल्हासनगर कॅम्प नं ३ अमन सिनेमा या ठिकाणी ०१ असे एकूण ३० रुग्ण आज आढळले असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें