





जनहित न्यूज महाराष्ट्र
उल्हासनगर महानगरपालिका प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व रस्त्यातील खड्डे दुरुस्ती कामे ठेकेदारामार्फत करून घेत असते परंतु या वर्षी देशात कोरोना सारख्या महामारी ने थैमान घातले असून यामुळे महानगरपालिकेचे कामकाज धीम्यागतीने सुरू आहे
सध्या नाले सफाई चे काम सुरू केले आहे…. परंतु रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केलेले नाही सध्या लॉक डाऊन असल्याने शहरात व रस्त्यावर रहादारी कमी आहे या मुळे या रस्त्याची कामे त्वरित झाली तर पावसाळ्यात खड्ड्या पासून होणारी जीवित हानी वाचू शकते
उल्हासनगर शहरात अनेक वेळा पावसाळ्यात व पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या खड्ड्यांनी जीवित हानी झालेली आहे
प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये या करिता पावसाळ्यापूर्वीच रस्त्यातील खड्डे भरणे गरजेचे आहे
उल्हासनगर महानगर पालिकेने शहरात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम चालू केलेले आहे. उल्हासनगर पूर्व याठिकाणी सिमेंट काँक्रीट चे काम झालेले आहे तसेच शहाड रेल्वे स्टेशन पासून चोपडा कोर्ट कडे येणारा रस्ताही व्यवस्थित झालेला आहे याबद्दल शंका नाही
परंतु काही रस्ते वर्दळी चे आहेत त्याच ठिकाणी अपघात घडत असतात आणि त्याला कारण असते फक्त रस्त्याचे खड्डे
प्रत्येक वर्षी उल्हासनगर शहरात रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी नागरिक रस्त्यावर येऊन अनेक प्रकारचे आंदोलने करताना पाहिले आहेत. गणेशोत्सव मंडळ तसेच नागरिक. रिक्षा चालक मालक युनियन संघटना. तर कधी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीसुद्धा उल्हासनगर शहरातील रस्त्यांचे खड्डे मागील वर्षी भरून काढल्याचे चित्र दिसले आहे परंतु यावर्षी हे चित्र दिसण्या पूर्वी उल्हासनगर महानगरपालिका संबंधित अधिकारी यांनी रस्त्याच्या खड्ड्यांकडे लक्ष घालावे जेणे करून मागील वर्षाचे चित्र पुन्हा दिसणार नाही
उल्हासनगर कॅम्प नंबर 3 कल्याण अंबरनाथ रोड वरील अशोक सिनेमा व व फालवर लाईन राधास्वामी सत्संग चौक याठिकाणी रस्ते सुरक्षित असावेत रेड क्रॉस हॉस्पिटल जवळील चौकात. तसेच खेमाणी चौक. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 भाजी मार्केट जवळील मेन रोड. सेक्शन 17 पेट्रोल पंप चौक. शांतीनगर समशान भूमी चौक. डरबी हॉटेल ओल्ड एसबीआय बँक चौक.
असे अनेक ठिकाणी मेन रोड वर खड्डे दिसत आहेत. तर अनेक वस्त्यांमधील रहदारीची रस्ते खराब झालेल्या अवस्थेत आहे. त्यापैकीच एक उल्हासनगर कॅम्प नंबर 5 उल्हासनगर महानगरपालिका वसाहत वाल्मिकी नगर याठिकाणी 1 वर्षापूर्वी नाल्यावर असलेला लहान पुलाची जमीन ढासळली असून 1 वर्षा पूर्वी प्रभाग समिती 4 बांधकाम विभाग चे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी करून गेले असतानाही त्या पुलाचे काम सुरू झाले नाही.. त्या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंब यांची रहदारी असते
त्यातच लहान लहान मुलेही त्याच ठिकाणी ये-जा करीत असतात.. सदर या पुलाचे काम आणि शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम कधी सुरू होणार आहे या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र


टिप्पणी करे